Skip to main content

Shades of Love...

मन...?
प्रेम म्हणजे काय?
मानवी भाव भावनांचा एक खेळच का?
मग त्यात आदरयुक्त प्रेम म्हणजे काय?
तेच का ते आई वडिलांवरचे प्रेम ?
बरं याची सुरुवात कुठून  होते ?
खरंच  लहान  बाळाला  भावना  असतात का?
माझ्या मते आपण आपल्या  सारख्या व्यक्तीच्या शोधात असतो.
जो आपल्याला  सर्वाधिक  जाणेल, जो आपल्या विषयी  काळजी करतो,
जो आपल्या सोबत प्रत्येक  परिस्थिती मध्ये  सोबत असेल.
जेव्हा अशी एखादी व्यक्ती सापडते, आपण त्याच्याविषयी काळजी करायला सुरुवात करतो,
किंबहुना त्याचा सहवास आपल्याला आवडायला लागतो. आपण त्या व्यक्तीशी जोडलो जातो.
त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडू लागतो.

हेच असेल ना प्रेम ?

मग त्यात आपली मत जुळायला लागतात किंबहुना जुळणाऱ्या मतांमुळॆ आपण अधिक जवळ येतो.
एक दुसरी बाजू अशी की, ही एक भावना आहे जी आपण व्यक्त करू शकत नाही , हि होऊन जाते, कळत-नकळत...
आपल्याला विश्वास असतो सुखदुःखात आपल्या सोबत नक्कीच ही व्यक्ती असेल .
मग यात आपण दुसऱ्याला त्याच्या वागण्यावरून आणि गुण अवगुण याच्या वरून तुलना करू लागतो.
जर एका पेक्षा अधिक व्यक्तीत  तेच गुण असतील तर काय?
Shades of Love...

मग हेच का ते wavelength जुळणे.

प्रत्येक गोष्टी मागे कारण असते.  मग याच्या मागच्या कारणांचा आपण कधी शोध घेतला आहे का?
मग परत त्या विशिष्ट व्यक्तीतील गुण अवगुण कमी झाले, तर याचा त्याचा प्रेमावर परिणाम होतो का?
जर अजून खोलवर विचार केला तर , प्रेम हा harmones चा खेळ आहे असे वाटत नाही का?
सुंदर दिसणे हा एक मेंदूचा खेळ आहे, शेवटी जुन्या अनुभवावरूनच आपण सुंदरतेची तुलना करतो ना ?
कसे होत असेल हे?
जर मानवी मेंदूला एखादी गोष्ट चांगली वाटली तर आपण त्याच्या विषयी अधिक विचार करतो...
मग काही neurons trigger होत असतील...
मग हा सर्व मनाचा खेळ नव्हे का ?
किंबहुना शारीरिक गरजांमधूनच कुठेतरी याची सुरुवात झाली असेल का?
मग यात theory of evolution चा काही संबंध असेल का आणि असेल तर नक्की कसा?

Shades of Love..

#प्रेम
तुम्हाला हे विचार पटतात का?
हा लेख आवडला का ?
या विषयी comments मध्ये नक्की कळवा...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Those 2 incredible days in Tarkarli...!!!

प्रवास वर्णन... Travelogue वगैरे वगैरे... खरंतर हे प्रवासवर्णन आग्रहाने मराठी लिहावे असे ठरवले. सुट्टीहून इथे आल्यावर फिरायला जायचे आहे हे तर नक्की होतो. पण कधी हे मात्र नक्की नव्हतं. अचानक कॉल आला. संदेश होता "पाच मिनिटात Cse stairs वर ये ट्रिपचे नियोजन करायचे आहे". उत्तेजित झालेला मी लगबगीने stairs वर पोहोचलो. स्वागत तर उत्साहाने झालेच. नंतर कळाले की परवा 29 तारखेला निघायचे आहे. मग काय गाडीचे नियोजन, हॉटेलचे नियोजन सर्वकाही डोळ्यासमोर येऊ लागले. यक्षप्रश्न होता कोण आणि किती जण येणार? अथक प्रयत्नानंतर सहा जण तयार झाले. मग काय, फोन करणे सुरु होतेच. काहीजण घरी विचारत होते तर काहीजण गावी होते. संध्याकाळपर्यंत सर्वांना विचारून झाल्यावर लक्षात आले की सर्वजण directly किंवा indirectly नाहीच म्हणत आहेत. गेल्या वेळेसारखेच परिस्थिती होती. गाडी बुक केली होती १७ सीटर, यायला तयार होते नऊ जण. मग काय आदल्या रात्री ती कॅन्सल करून तवेरा बुक करावी लागली. प्रारब्ध म्हणा किंवा नशीब म्हणा, काहीही म्हणा... या सहलीत आम्हाला काका भेटले. एक अवलिया व्यक्तिमत्व. बारावीनंतर मुंबईला घेऊन पैसे कमव...

खरंच, कीव येते मला मोदी भक्तांची!

          सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळला आहे. रवीश कुमार यांच्यासारखे काही योद्धे खंबीर लढा देत आहेत. बहुतांश मीडिया सरकारची स्तुती करण्यात मग्न आहे. बिहार, आसाम मधील पूरस्थिती पेक्षा राम मंदिराचा प्रश्न आजकाल मेनस्ट्रीम मीडियाला महत्त्वाचा वाटतोय का, तर हो? उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये जिथे अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आरोग्यव्यवस्था आहे, तिथेदेखील सरकारची मंदिरा विषयीची भूमिका बघून खरंच त्याला समर्थन करणाऱ्यांची मला कीव येते! अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दवाखाने उभारण्याची गरज आहे, तेव्हा प्राइम टाईम मध्ये "कब बनेगा राम मंदिर" असे विषय महत्त्वाचे वाटत असतील ना तर खरंच ही प्राईम टाईम बघनाऱ्याची मला कीव येते. त्यातही त्यांची चूक नाही म्हणा ते आतापर्यंत हेच बघत आहेत. पण खरच वाटत नाही का तुम्हाला, जेव्हा हनुमान चालीसा म्हटल्याने कोरोना बरा होईल अशी म्हणणारी साध्वी प्रज्ञा स्वतः AIIMS मध्ये जाते आणि दुसऱ्यांना म्हणते की हनुमान चालीसा म्हटल्याने कोरोना बरा होईल, हा इतका स्पष्ट विरोधाभास देखील दिसत नसेल का काही लोकांना? ते असो परिस्थितीची जाण असणारे काही जण बोल...

Online Courses: The boon of the Digital Era...

So how are you? well no blog post since months first of all sorry for that. Today I will tell about online education. In this digital era everything has came online you can do almost everything online nowadays. So why not study? Do you know that you can learn from Harvard and MIT professors free of cost! Why so far, even IIT and NIT professors are now available on Swayam and NPTEL. So what do you need? The laptop with internet connection. Most of us might be staying in hostel, enjoying YouTube videos (of course using VPN), playing PUBG on hostel Wi-Fi. So why we aren't going for an online course? There might be two choices either you know about it or you don't. If you know about it then it's your choice and I don't care about it. But if you don't know then this blog is specially for you. Nowadays you don't need facilitators to learn something YouTube itself is the biggest teacher.  You search for anything tons of results will appear there for you....