Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

खरंच, कीव येते मला मोदी भक्तांची!

          सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळला आहे. रवीश कुमार यांच्यासारखे काही योद्धे खंबीर लढा देत आहेत. बहुतांश मीडिया सरकारची स्तुती करण्यात मग्न आहे. बिहार, आसाम मधील पूरस्थिती पेक्षा राम मंदिराचा प्रश्न आजकाल मेनस्ट्रीम मीडियाला महत्त्वाचा वाटतोय का, तर हो? उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये जिथे अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आरोग्यव्यवस्था आहे, तिथेदेखील सरकारची मंदिरा विषयीची भूमिका बघून खरंच त्याला समर्थन करणाऱ्यांची मला कीव येते! अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दवाखाने उभारण्याची गरज आहे, तेव्हा प्राइम टाईम मध्ये "कब बनेगा राम मंदिर" असे विषय महत्त्वाचे वाटत असतील ना तर खरंच ही प्राईम टाईम बघनाऱ्याची मला कीव येते. त्यातही त्यांची चूक नाही म्हणा ते आतापर्यंत हेच बघत आहेत. पण खरच वाटत नाही का तुम्हाला, जेव्हा हनुमान चालीसा म्हटल्याने कोरोना बरा होईल अशी म्हणणारी साध्वी प्रज्ञा स्वतः AIIMS मध्ये जाते आणि दुसऱ्यांना म्हणते की हनुमान चालीसा म्हटल्याने कोरोना बरा होईल, हा इतका स्पष्ट विरोधाभास देखील दिसत नसेल का काही लोकांना? ते असो परिस्थितीची जाण असणारे काही जण बोल...